जीवनाचे वर्णन करतांना जी वाक्यं चपखल बसतात.. तीच वाक्यं मृत्यूचे वर्णन करतांनाही चपखल बसतात असे वाटले! तीच कल्पना इथे मांडायचा प्रयत्न केलाय.
जीवन म्हणजे सागर असतो
शांत गंभीर भासणारा..
वादळांस प्रसवणारा..
नवा प्रलय दाखवणारा..
जीवन म्हणजे वादळ असतं
खंबीर झाडांना उचकटून टाकणारं..
रूळलेल्या वाटांमधून घोंघावणारं..
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारं..
जीवन म्हणजे असतो किनारा
वादळाला उरावर घेणारा..
उध्वस्ततेतून सावरणारा..
नवलाईची बीजं रोवणारा..
मृत्यू म्हणजे अनाहूत चाहूल
खंबीर झाडांना उचकटून टाकणारी!
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारी!
नवलाईची बीजं रोवणारी!
नवा प्रलय दाखवणारी!!
राघव
[ २०१० ]
No comments:
Post a Comment