Saturday, June 5, 2021

कविता : ध्येय!

पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :)

आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!

कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!

[ २००९ ]

राघव

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...