Saturday, June 5, 2021

कविता : कल्लोळ..!!

कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!

तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!

नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..

असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!

--

अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!

राघव

[ २०१३ ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...